Slider 01 Slider 02 Slider 03 Slider 04
|| "WANTED STAFF" Applications are invited for the post of Principal, Director, Assistant Professors & other Post At Our Non Granted College of Arts, Science & Commerce, Manur for Academic Year 2021-22 : ( Click Here To View Advertisement ) || (Click Here To Download Application Form for the post of Principal, Assistant Professor & other Post) ||

संस्थेची स्थापना उद्दिष्टे व सध्यास्थिती :

          आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेची स्थापना थोर स्वातंत्र्यता सेनानी शि़क्षक व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी १ जुन १९४५ रोजी केली. सामाजिक व सेवाभावी दृष्टीने शैक्षणिक क्षॆत्रात स्वातंत्रपुर्व काळापासुन आदिवासी सेवा समिती, संस्थेचे अत्यंत महत्त्वपुर्ण योगदान राहीले आहे. आदिवासी सेवा समिती, नाशिक ज्या-ज्या भागात आपले कार्य सुरु करील त्या-त्या भागात साधारणपणे सर्व प्रकारच्या शैक्षणिक चळवळी सुरु करणे की, ज्यामुळे शिक्षणात वाढ होईल व विषेशत: त्या भागातील लोकांच्या सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांकडे अधिक लक्ष दिले जाईल. संस्थेत सध्या ३ बालमंदिरे, ४ प्राथमिक शाळा, १३ माध्यामिक शाळा, २ उच्च माध्यामिक विद्दालये, १८ प्राथमिक आश्रमशाळा, १७ माध्यमिक आश्रमशाळा, २ क्रुषी तंत्रनिकेतन आज मितीस यशस्वी रित्या चालविण्यात येत आहेत. तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठी ५९ वसतिगृह संस्थे मार्फ़त चालविण्यात येत आहेत.

आजपर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व वळणे :

        आदिवासी व मागास जमाती स्वातंत्र्यपूर्व काळात जे जीवन कंठीत होते तसे जीवन स्वातंत्र्यानंतरही आर्थिक आणि शैक्षणिक लाभ न मिळाल्याने जगत होते आणि केवळ बहूजन समाजासमोर आदिवासी मागासवर्गीय जनतेत शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यांचे जीवनमान उंचावले जावे या उदान्त हेतूने कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या दीपस्तंभासारख्या आधाराने आदिवासी सेवा समितीच्या कार्याची सुरुवात १ जून १९४५ रोजी केली. संस्थेने प्रथमत: मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे व व्होलंटरी शाळा सुरु करुन आपले कार्य सुरु केले.
   
          संस्थेचे संस्थापक कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर संस्थेची धुरा कै. लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी सन १९६१ ते १९८० पर्यत मोठ्या धडाडीने सांभाळून २० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक शाखा सुरु करुन सुसज्ज अशा इमारती बांधून संस्थेचे शैक्षणिक कार्य संबंध जिल्हाभर व शेजारील जिल्ह्यात पसरविले. 
कै. व्यंकटराव हिरे यांच्या दुख:द निधनानंतर सन १९८० ते आजतगायत संस्थेचे सेक्रेटरी, समाज श्री. प्रशांतदादा हिरे यांनी अनेक लोक उपयोगी उपक्रम राबवून संस्थेच्या कार्याची वाटचाल हिरक महोत्सवाकडे सुरु केली आहे.

<<अधीक माहीती >>

   Dowload / View Profile IN English

सध्या चे नवीन काही :

 

 

आमच्या विषयी

संस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्या त्या भागातील लोकांच्या शैक्षणिक तसेच सांस्क्रूतिक जीवनात सुधारणा होण्याच्या द्दूष्टीने शिक्षणाबरोबरच क्रूषी फलोद्यान, दुग्धविकास,सुतारकाम व संगीत या सारखे शिक्षणही देण्य़ाचे पवित्र कार्य संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सभासद व शाखाप्रमुख कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अविरत चालू आहे.